मंगळवार, ३१ जुलै, २०१२

खरंच का गगन ठेंगणे ?

काल काही वर्तमान पत्रात हेड लाईन वाचली - " भारताला गगन ठेंगणे ".

तेव्हा मला पडलेला हा प्रश्न -  खरंच का गगन ठेंगणे ?

गगन नारंग. २०१२ च्या ऑलंपिक मध्ये भारताचं नाव पदक तक्त्यात आणणारा पहिला खेळाडू. एक जिगरबाज नेमबाज. अपेक्षेनुसार कामगिरी साधणारा एक हरहुन्नरी. त्यानं पदक मिळवलं आणि लगेच हरियाना सरकारनं त्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. सरकारी तिजोरीतून कुणा एका व्यक्तीला पैश्याच्या स्वरुपात अशा रीतीने बक्षीस देणं योग्य आहे ?

प्रश्न

( या पोस्टमधल्या मुलाला पडलेला प्रश्न स्वभाविक नाही काय? )
आपल्याकडे शिक्षण समित्या असतात. त्या समित्यांवर अनेक शिक्षण तज्ञ असतात. तरीही अभ्यासक्रमात कोणतीही सुसूत्रता नसते. बर्याच वर्षापूर्वी " मुलांच्या पाठीवर एवढे ओझे येते कुठून " हा माझा लेख दैनिक सकाळमधून प्रकाशित झाला होता. अर्थात माझ्या लेखामुळे परिस्थितीत कोणताच बदल झाला नाही.

अनेक मंत्री आले. त्यांनी अनेक प्रयोग केले. वर्तमान पत्रातून झळकणारी गुणवत्ता यादी गायब झाली. अगदी आठवी पर्यंत परीक्षाच नकोत. इथपर्यंत निर्णय झाला. कारण काय तर म्हणे

मी कुणाचा दास नाही

( हि मराठी कविता एका खूप उद्विग्न मनस्थितीत लिहिली आहे. ज्वालामुखीतून उफाळणारा लाव्हा बाहेर पडावा, तशी एका वास्तव प्रसंगी हि कविता आकाराला आली आहे. म्हणुनच ......

ते विषाचा घागरी
मी अमृताचा गडवा

किंवा

पेरतो मी सदगुणांना
भोवतीने भोवताली ............

या सारख्या ओळी वाचून. हा काय स्वतःला फार सदगुणी समजतो काय ? असा सूर कुणीही काढू नये. माझी मनस्थिती समजावून घ्यावी.  दुर्गुण माझ्यातही आहेत. पण


सोमवार, २ जुलै, २०१२

हे किडे कशासाठी ?

२२ वर्ष नौकरी केली. वडीलांच्या आकस्मित निधनानं पोरक्या झालेल्या शेतीला आधार देण्यासाठी नौकरी सोडायचा निर्णय घेतला. मोठ्या हौसेने प्रोडक्शन म्यानेजर या मोठ्या पदावरची एका बहु देशीय  कंपनीतली नौकरी सोडून शेती करायला गेलो. वडील गेल्यानंतर ऑक्टोबर २०१० ला चार एकर उस लावला होता. डिसेंबर २०११ ला नौकरी सोडून कायमचा शेतावर गेलो. नव्यानं दीड उस एकर लावला. दीड एकर भुईमुग पेरला. एकरभर भेंडी लावली. आणि

रविवार, १ जुलै, २०१२

ऑक्सिजनचा हिशोब

आयुष्यात आपण खूप हिशोब करतो. या महिन्यात पेट्रोलला किती पैसे गेले.......सिनेमे पाहण्यावर किती पैसे खर्च झाले.......बस खर्च किती झाला.......किराणा कितीचा झाला.........वगैरे वगैरे. कारण या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसे मोजावे लागता. घरातल्या ग्यास सिलेंडरचे भाव वाढले तर आपल्याला लगेच कळतं. पण आमच्या ग्रामीण भागातील जनतेला त्याच्याशी काहीएक घेणंदेणं नसतं. कारण